“गावाच्या नावात चूक… पण आमदार शांतच का?”
गावाचं नाव म्हणजे गावाचा अभिमान… पण जेव्हा गावाच्या नावाचाच फलक चुकीच्या नावाने लिहिला जातो आणि तो चूक सुधारण्याऐवजी दुर्लक्षित केला जातो, तेव्हा गावकऱ्यांचा संताप ओघानेच उसळतो.
असंच काहीसं घडलं एका प्रमुख आमदाराच्या गावात. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या फलकावर गावाचं नाव चुकीचं लिहिलं गेले आहे. विशेष म्हणजे, ही चूक अनेक दिवसांपासून तशीच आहे, पण गावाचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी या प्रकरणाकडे अजूनही दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांत नाराजीचं वातावरण आहे.
गावकऱ्यांच्या मते, “आपल्या गावाच्या नावात चूक झाली असताना देखील आमदार गप्प राहतात म्हणजे त्यांना गावाच्या अस्मितेची जाणीव आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनी यासंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

