ग्रामीण भारतातील अनेक मुलांसाठी चांगल्या शाळेपर्यंत पोहोचणे आजही एक संघर्ष आहे

wartaa.in
wartaa.in

ग्रामीण भारतातील अनेक मुलांसाठी चांगल्या शाळेपर्यंत पोहोचणे आजही एक संघर्ष आहे

📍 Maharshtra15 Aug 2026
▶ 0

स्वातंत्र्याला जवळपास ८० वर्षे झाली, पण ग्रामीण भारतातील अनेक मुलांसाठी चांगल्या शाळेपर्यंत पोहोचणे आजही एक संघर्ष आहे.

आजही अनेक मुले शिक्षणासाठी दररोज अनेक किलोमीटर पायी चालतात. कुठे रस्ता नाही, कुठे वाहतुकीची सुविधा नाही, तर कुठे शाळेची आणि मूलभूत सुविधांची कमतरता आहे.

मग प्रश्न पडतो…

स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतरही ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी एवढा संघर्ष का करावा लागतो?

गावातील मुलांनाही शहरातील मुलांइतक्याच चांगल्या शाळा, सुरक्षित रस्ते, वाहतूक आणि शिक्षणाच्या सुविधा मिळायला हव्यात. त्यांच्या स्वप्नांना गावाच्या भौगोलिक परिस्थितीची मर्यादा असता कामा नये.

ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.